Adv Sariputta (Anand) Pramod Sarnath

Adv Sariputta (Anand) Pramod Sarnath I Don't care. about those. who. don't care. for. me. and. also. those. don't have faith in me. but. there are some people. for whom. I care a lot. my family. n my friends.

If you wanna know me just dial my frndz cell no.

03/11/2019

#पदवीधर_मतदान_म्हणजे_काय?
#पदवीधर_मतदारसंघ_निवडणूक 2020

आपल्याकडे ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकांना महत्व आहे. परंतु दुर्दैवाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. कित्येकांना तर अशी काही निवडणूक असते हेच मुळात माहीत नाही म्हणून हा माहिती देण्याचा प्रपंच…

आपल्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन कायदेमंडळ गृहे आहेत हे आपण नागरिकशास्त्रात वाचले असेलच. महाराष्ट्रासह भारतातील एकूण सात राज्यात अशी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश होतो. या सर्व राज्यांमध्ये विधानसभेसोबत विधानपरिषदेचेही कामकाज चालते. विधानसभेच्या सदस्यांना इंग्रजीत MLA म्हणतात तसे विधानपरिषदेच्या सदस्यांना MLC (Member of Legislative Council) असे संबोधले जाते. नुकतीच आपली विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तिथले सदस्य कसे निवडले जातात हे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु विधानपरिषदेचे सदस्य कसे निवडले जातात याची थोडी कल्पना असणे गरजेचे आहे.

महाराष्‍ट्र विधानपरिषदेत एकूण 78 सदस्य कार्यरत असतात. त्यापैकी 31 सदस्य विधानसभेतून, 21 सदस्य स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधून, 12 सदस्य राज्‍यपालांच्या नेमणूकीमधून, 7 सदस्‍य शिक्षक मतदार संघातून आणि 7 सदस्‍य 'पदवीधर' मतदार संघातून निवडले जातात. विधानपरिषदेच्या सदस्यांच्या निवडी एकाचवेळी होत नाहीत. विधान परिषद हे कायम सभागृह असते. त्‍यातील सदस्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ असतो आणि दर दोन वर्षानी एक तृतीयांश सभासद निवृत्त होत असतात व तितकेच नवीन नेमले जातात. आपल्या महाराष्‍ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यात सात पदवीधर मतदारसंघ मुंबई, पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपुर, नाशिक आणि अमरावती याप्रमाणे विभागले गेले आहेत.

आता येणाऱ्या जुलै 2020 मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. पण मी त्याबद्दल आजच का सांगतोय? कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे 5 नोव्हेंबर 2019. म्हणजे आपल्या हातात आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. महत्वाचं म्हणजे पूर्वी नाव नोंदणी केली असली तर आता जुनी यादी रद्द करण्यात आलेली आहे. यावेळी जे नाव नोंदवतील त्यांनाच मतदानाचा अधिकार असेल.

लक्षात घ्या, सामान्य नागरिक म्हणून आपली जशी कर्तव्ये आणि अधिकार असतात तसेच अधिकार पदवीधर म्हणूनही असतात. ग्रॅज्युएट झाल्यावर घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायची संधी दिली असते. हा आपण निवडलेला प्रतिनिधी आपल्या समस्या सभागृहात मांडतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. जर तो तसे करत नसेल तर त्याला जाब विचारण्याचा अधिकारही आपल्याला आहे. आपण अपेक्षेप्रमाणे कामे झाली नाही तर आमदाराला जाब विचारतोच ना? मग निवडून गेलेला पदवीधर प्रतिनिधी नेमकं काय करतोय हे ही जाणून घ्यायला हवंच की.

● पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता:
१. तो भारताचा नागरीक असावा.
२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्‍सम विद्‍यापिठाचा पदवीधर असावा.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा
४. त्‍याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.
५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्‍य असेल तरच पदवीधर गृहित धरण्‍यात येईल.
● मतदान पद्धत
- पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.
- मतपत्रिकेवर नमुद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.
- सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.
- पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१, २, ३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील).
- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत.
- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्‍यात यावा. अन्‍यथा मत बाद ठरेल.
- "वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.
- 'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा.
मी कधी असे आवाहन करत नाही, पण यावेळी करतो... पोस्ट जास्तीतजास्त शेअर करा... आपले मतदान अमूल्य असते!

08/04/2016

In the recent times I see three ideologies in India.
1) Traditional, anti rationals n religious which include right wingers, religious extremists (be it any religion Hindu, Muslim, Christians, Buddhist, Jains, Jews or Sikhs)
2) Pseudo progressives like those who blame the Brahmins for caste system n other social evils but want to maintain their caste dominance on the society n have terror groups or pressure groups within political parties
3) the progressive people with secular, rational n socialist thoughts, very few in number n also being attacked literally by the first group n avoided by the second group...
But to be frank it is the third group who is going to save everyone from the evils of the first group n lead the nation towards a united n progressive nation which might lead the world in the present situation...

10/01/2012

तू, साँसों मे हैं तू, धडकनों मे तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू

हळव्या दवात भिजली पहाट तू
हळुवार सांज की चांदरात तू
शब्दाविना बोलणारा, स्पर्शातुनी सांगणारा
मुका गोड अनुराग तू

तू, साँसों मे हैं तू, धडकनों मे तू
चिंब अोल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू

गंधीत श्वास की स्वप्नभास तू
लागे जिवास तो एक ध्यास तू
का वाटते कोण जाणे, धुंदावल्या श्रावणाचा
सख्या स्वैर अनुवाद तू

तू, साँसों मे हैं तू, धडकनों मे तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
तू, साँसों मे हैं तू, धडकनों मे तू
चिंब अोल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू

10/01/2012

शिवबा म्हणजे सुन्दरता
शिवबा म्हणजे संपन्नता,
शिवबा म्हणजे साहस
शिवबा म्हणजे स्वातंत्र,
शिवबा म्हणजे खास
शिवबा म्हणजे एकी ,
शिवबा म्हणजे नेकी
शिवबा म्हणजे श्वास,
शिवबा म्हणजे ध्यास
शिवबा म्हणजे विश्वास,
शिवबा म्हणजे पापाचा नाश
शिवबा म्हणजे स्वराज्य,
शिवबा आयुष्याचा भाग आविभाज्य
।मुजरा असा पहिला शिव छञपतीला।
।। जय शिवराय ।।

10/01/2012

माझी ती अशी असावी,जगात
दूसरी तशी नसावी,मलाच सर्वस्व
माननारी,माझी ती अशी असावी...प्रानजळ
असावी, अवखळ असावी,परी ती अगदी सोज्वळ
असावी,सर्वांना अगदी आपलं
माननारी,माझी ती अशी असावी...फारच
सुंदर, फारच गोरी,फारच देखणी पण
नसावी,मजवर भरपूर प्रेम
करणारी,माझी ती अशी असावी...आपली माणसं,
आपलं
घर ,आपलेपणा जपणारी असावी,ससूलाही आई
म्हणनारी,माझी ती अशी असावी...चाणाक्ष,
हुशार, व्यवहारी,आयुष्यातील
सल्लागार व्हावी,माझ्या चुका लक्षात
घेणारी,माझी ती अशी असावी...माया,
प्रेम आपुलकी,हे सर्व
देणारी असावी,माझी ती कशी असावी?
माझी ती अशी असावी..

10/01/2012

If u love someone let him loose
thn
if he don't come back he was never urs...
but
if he comes back he is the person who will never leave loving u...

10/01/2012

I Don't care...

about those...

who...

don't care...

for...

me...

and...

also...

those...

who...

don't have faith in me...

but...

there are some people...

for whom...

I care a lot...

my family...
n
my friends...

If you wanna know me just dial any of my friend's cell number...

They'll help you out in knowing me...

coz...

Only my close one's know me well...

"I am what I am"

No one can know me in one conversation...

but...

Once a person meets me he or she becomes my friend forever...

Address

'Chaitya Graha', 1610, Ganeshnagar
Sangli
416416

Telephone

+919021099009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Sariputta (Anand) Pramod Sarnath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv Sariputta (Anand) Pramod Sarnath:

Share