06/04/2026
विषय : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षितता, प्रशासनिक दक्षता राखणे व सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत निवेदन.
महोदय,
आपणांस वरील विषयावर निवेदन सादर असे की, दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरी केली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून, समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्ये यांचे ते महान पुरस्कर्ते होते. त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम, मिरवणुका, सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, पुष्पचक्र अर्पण, जनजागृती उपक्रम इत्यादी मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटना सहभागी होत असतात.
अशा परिस्थितीत, सदर जयंती पूर्णपणे शांततेत, सुव्यवस्थित, सन्मानपूर्वक व कुठल्याही अप्रिय प्रकाराशिवाय पार पडावी, तसेच जयंतीला कुठलेही गालबोट लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने आपणांस खालील मागण्या विनम्रपणे सादर करीत आहोत :-
आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
१)जिल्ह्यात विशेष कायदा व सुव्यवस्था यंत्रणा तैनात करावी
१४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व संवेदनशील, गर्दीची व प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा.
आवश्यक त्या ठिकाणी अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी, SRPF / राखीव पोलीस फौज तैनात करण्यात यावी.
जयंती मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम व चौक-चौकातील गर्दीच्या भागांमध्ये विशेष गस्त ठेवण्यात यावी.
२)सर्व कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने समन्वय साधावा
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, तहसील प्रशासन, महानगरपालिका / नगरपरिषद / ग्रामपंचायत प्रशासन यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.
जयंतीच्या पूर्वसंध्येला शांतता समिती बैठका घेऊन सर्व समाजघटक, संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करण्य