Yogesh D Thorat Astrologer

Yogesh D Thorat Astrologer Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogesh D Thorat Astrologer, Lawyer & Law Firm, Yogesh D Thorat (Advocate) BJ/13 Thakkar Buzzr's, New C B S, Nashik 2, Mob No . 9850413119; 9326889727;, Nashik.

श्री अनघाष्टमी व्रतअनघास्वामी आणि अनघालक्ष्मीअनघास्वामी आणि अनघालक्ष्मीकेवळ विद्वानांचाच नाही तर सर्व साधारणांचाही उद्धा...
02/03/2019

श्री अनघाष्टमी व्रत
अनघास्वामी आणि अनघालक्ष्मी
अनघास्वामी आणि अनघालक्ष्मी
केवळ विद्वानांचाच नाही तर सर्व साधारणांचाही उद्धार करण्यासाठीच श्री दत्तअवतार, दत्ताचा जन्म झाला आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे. अवतार तत्वाचे महत्व क्षीण झाले आहे व आता केवळ पंडीत व उपासक यांच्यापुरतेच महत्व उरले आहे. परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, इत्यादी अवतार आहेत.

श्री दत्तगुरुचे तत्व कल्पनातीत आहे. अवधूत स्वामींच्या रुपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तीचे एक गृहस्थ रुप पण आहे. ही माहीती बऱ्याचश्या पंडीतानाही माहीत नाही. नित्य अनेक रूपांत प्रकट होणारे स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्निचे नांव अनघा देवी आहे. जी साक्षांत लक्ष्मीचा अवतार आहे. हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहीक सुख, तत्वज्ञानव्दारा अनुग्रहीत करीत असतात. या दिव्य दांपत्याच्या अष्ट सिद्ध मुलांचा अवतार झाला आहे.

पद्मासनस्थां पदयुग्मनूपुरां पद्मं दधानाममयं च पाण्यो:।
योगार्थे संमीलिता निश्र्चलाक्षींदत्तानुरक्ताम् अनघां प्रपद्ये॥

श्रीप्रभूंच्या दत्तावताराला ‘स्मर्तृगामी’ (स्मरण करताच भक्तावर कृपा करणारे दैवत) असे म्हटले आहे. याचाच अर्थ खूप तपाचरण, भक्ती करणाऱ्या भक्तावरच ते कृपा करतात असे नव्हे तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करताच ते त्याच्यावर कृपावर्षाव करतात. अशा या परमकारुणिक दत्तदैवताने वेगवेगळ्या काळात वेगवेगळे अवतार धारण केले. त्यातील पहिला अवतार म्हणजे ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ होय. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापूर येथे इ. स. १३२०मध्ये अप्पलराज व सुमती या पुण्यवान दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने साक्षात् श्रीदत्तगुरू प्रकट झाले व त्यांनी या अवतारात अनेकांचा उद्धार केला. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याच काळातील परम भक्त शंकरभट्ट यांच्याकडून त्यांच्या लीला चरित्र ग्रंथांची रचना करून घेतली व हा ग्रंथ ७०० वर्षांनी प्रसिद्ध होईल, असे सांगून ठेवले. मूळ तेलगूत असलेल्या ह्या ग्रंथाचे मराठी भाषांतर हैद्राबादच्या प. पू. श्री हरिभाऊ निटूरकर यांनी केले आहे.

अनघा लक्ष्मी व अनघा मंदिर पिठापूर
अनघा लक्ष्मी, अनघा मंदिर पिठापूर
या अनघ दंपतिची उपासना पद्धती, कृतयुगांत साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वत: सांगितली, ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे. या युगात या उपासनेचा. व्रताचा प्रचार केल्याने कार्तवीर्य चक्रवर्ति होऊन त्याने एका स्वर्णयुगाचे निर्माण केले. त्रेतायुगांत प्रभु श्रीराम व दशरथ महाराज यांनी हे व्रत आचरण केले. असा पुराणांत उल्लेख केला आहे.

भावीश्योतर पुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण व दत्तपुराण इ. ग्रंथात या व्रताचा उल्लेख आढळतो. यातही भावीश्योत्तर पुराण व ब्रह्मांड पुराण।त हे व्रत केवळ मार्गशीर्ष कृष्णा अष्टमीस व श्रीपाद चारितामृतात प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून हे व्रत करण्यास सांगितले आहे. श्री दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे हे पंचमाश्रमी आहेत. ग्राहस्थाश्रमाचे आचारण हि त्यांनी केलेले आहे. अत्रिपुत्र दत्त हे अनघा दत्त आहेत व त्यांची पत्नी अनघा लक्षमी रूप आहे. या दाम्पत्यास' निमी, ह्रिमान, किर्तीमान, जितात्मा, मुनींवीर्यक, दिप्तीरोम, अंशुमन, शैलाभ अशी आठ मुले आहेत. यांचे पूजनात्मक वृत् श्री दत्ताज्ञेने कर्तवीर्यराज।ने प्रथम केले. व पृथ्वीवर त्याचा प्रसार केला, या अनघा -दत्तव्रताच्या प्रभावानेच कार्तवीर्य आदर्श, महाशक्तीशाली राजा झाला. असे भगवान श्री कृष्णाने धर्मराजास सांगितले.

व्दापार युगांत हे व्रत थोडे क्षीण झाले. पण भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला उपदेश केला व ह्या व्रताचे आचरण करविले. सर्व भक्तांवर श्री सद्गुरुंच्या कृपादृष्टीमुळे कमी झालेले व्रत पुन: प्रसिद्ध झाले आहे.

श्री दत्तगुरूंचे ‘अवधूत’ हे स्वरूप तर आहेच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्त्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एक गृहस्थस्वरूपही आहे. याच गृहस्थस्वरूपाला अनघस्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात. व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा, पूजेचा संदर्भ आहे. सांप्रत अनेकांना याची माहिती नसते. अनघालक्ष्मीचे स्वरूप व व्रत समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.दत्तनाम महायोगी विष्णोरंशो महीतले ।
द्वितीयोऽनघो नाम लोकेऽस्मिन् परिश्रुत: ॥
तस्य भार्याऽनघा नाम बभूव सहचारिणी ।
अष्टपुत्राऽतीव वत्सा सवैर्ब्राह्म गुणैर्युता ॥
अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्र्चैषाऽनघा स्मृता ॥

anagha lakshmi vrat
श्री अनघाष्टमी व्रत
श्रीपादश्रीवल्लभचरित्रात अनघालक्ष्मीचे प्रकट झालेले स्वरूप अधिकच व्यापक आहे. श्रीपादश्रीवल्लभ स्वत: म्हणतात, अनघालक्ष्मीचा ‘अनघ’ हे माझे दत्तस्वरूप आहे. अर्थातच श्रीदत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे. तिच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देव व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत. म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्त्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे व तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव आहे. म्हणून अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या तादात्म्यस्थितीचे प्रतीक आहे. अनघ हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणाचे तादात्म्य धारण करून व्यक्त केलेले शक्तिस्वरूप आहे. या शक्तिस्वरूपाचा अनघालक्ष्मी हा आधार आहे. ती एक दिव्यशक्ती आहे. या दिव्यशक्तीला अनघदेवाने वामभागी धारण केले आहे.

सुरुवातीला एक यंत्र दिले आहे जे अष्टदल पद्म आहे. त्याच्या एक एक पाकळीत विविध देवतांची नावे लिहिली आहेत. घरांत एक सिंहासन तयार करून तांदूळ, हळद कुंकु, यांचे अष्ट दल पद्म तयार करून, विविधे देवतांच्या नावाच्या जागी कलश किंवा सुपारी, विडयाचे पान, तुळशीचे पान, ठेऊन विविध देवतांचे कल्पोक्त विधानाने आवाहन करावे.

या प्रकारे पिवळा, लाल पांढऱ्या रंगाने युक्त तीन धागे एकत्र करून त्याच्या मध्ये गाठ बांधावी व धागा वेदिकेच्या मधे अनघा दंपति जवळ ठेवावा. व्रत समाप्त झाल्यानंतर धागा उजव्या हातात बांधावा किंवा हा धागा आपल्या प्रिय व्यक्तीला देऊन त्यांना व्रताची दिक्षा दयावी. आवश्यकता आसल्यास २ किंवा ३ धागे तयार करून पूजा करता येते. धागा बांधताना प्रार्थना करावी.

ब्रह्म विष्णू महेशान
रूपिन त्रिगुण नायक ।
त्रैवर्णिक नमस्तुभ्यं
तोर देवाsनघात्मक ॥

अनघ स्वामींना नैवेद्य रूपांत अनेक फले, व पाच खारीका अर्पित करावीत. या शिवाय महानैवेद्यही दाखवावा.

अविवाहित मुली, पारिवारिक कलहग्रस्त यांना अनघा देवीची अर्चना (पूजा) कुंकुमाने केल्यास व्रताचा विशेष प्रत्यक्ष प्रभाव मिळतो. हे व्रत सर्व करू शकतात. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आहे. सामान्यत: प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. काही लोक शुक्ल अष्टमीलाही हे व्रत करू शकतात. अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्म व्दारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रुपात येते. अशा पापांना दूर करणारे. जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.

सर्व सद्भक्तांनी हे व्रत आचरण करून आपल्या सौभाग्यात वाढ प्राप्त करू शकतात व श्री गुरुदत्तांचे कृपा पात्र होऊ शकतात.

श्रीपादप्रभूंनी स्वत:च सांगितले आहे की, सरस्वती ही सृष्टीतील आद्यदेवता आहे. या ज्ञानदेवतेला प्रेरणा देणारी महासरस्वती आहे. म्हणून सरस्वती व महासरस्वती ह्या दोघी वेगळ्या आहेत. महासरस्वती हे अनघास्वरूपच आहे. सृष्टीचे स्थितीकरण, समृद्धीकरण हे लक्ष्मीमातेचे स्वरूप आहे. लक्ष्मीच्या या कार्याला प्रेरणा देणारी महालक्ष्मी हेही अनघास्वरूपच आहे. तसेच शक्ती हे स्वरूप असणारी काली देवता आहे व तिला प्रेरणा देणारी महाकाली ही कालस्वरूपाची प्रेरणा असणारे अनघास्वरूप आहे.

ही अनघालक्ष्मीच पद्मावती आहे, राजराजेश्वरी आहे. तसेच ती दशमहाविद्यास्वरूपिणीही आहे. सर्व अध्यात्मसाधनांचे अंतिम साध्य असणारी अध्यात्मविद्या-प्राप्ती हे तिचे प्रधान लक्ष्य आहे. दृश्य जगताच्या सृष्टीच्या मूलकारणाचा शोध घेणे हे या अनघालक्ष्मीच्या कृपेचे फलित आहे.

अनघालक्ष्मी ही संपूर्ण परिपूर्णता स्थिती आहे. राजराजेश्र्वरी विवेकाची स्वामिनी, महाकाली बलाची स्वामिनी, महालक्ष्मी सौंदर्य व समृद्धीची स्वामिनी, म्हणजेच विवेक, बल, सौंदर्य, समृद्धी व प्रत्येक कर्मातील कौशल्य (योग: कर्मसु: कौशलम्) या सर्वांच्या तादात्म्याने येणारी परिपूर्णता जीवनात असेल तरच अनघालक्ष्मीची कृपा होईल हे स्पष्ट आहे.

श्रीअनघादत्तव्रत प्रासादिक महत्वपूर्ण माहिती
ॐ श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयाय नम:
ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः

अनघालक्ष्मी
परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे. श्री दत्तगुरुंचे तत्व कल्पनातीत आहे अवधूत स्वामींच्या रुपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तींचे एक गृहस्थ रुप पण आहे. स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघस्वामी किंवा अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नांव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख, तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात. अनघ दंपतिची उपासना पद्धती, कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तर्वीर्यार्जुनाला स्वतः सांगितली.ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे. त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीहा आहे. पण कोणत्याही अष्टमीला केले तरी चालते. अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन, मन, वाचा, कर्म द्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्यारुपात येते. अशा पापांना दूर करणारे, जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.

श्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले श्रीअनघादत्तव्रत
सर्व स्त्री-पुरुषांनां संतती, संपत्ती, विवाहसौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्धव्रत. अनघाष्टमीव्रत श्रीदत्तसंप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे. फारच कमीजणांना त्याची माहिती आहे.

व्रत कोणी व केव्हा करावे
मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस (किंवा शुद्धाष्टमीस) "अनघाष्टमी" मानुन सकाळी हे व्रतकरावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुन करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे.

हे व्रत का करावे

ही अष्टमी 'अघ म्हणजे पाप' नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्याने पापनिरसन व दारिद्रनाश होऊन त्याला दैवीसंपत्ती, अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्वपुण्यकर्मफळांची प्राप्तीहोते. मनोकानापूर्ती व निर्मलकीर्तीलाभ होतो. सर्व रोगनिरसन होऊन, सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो. स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते, तसेच गृहकलहनिवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो.

व्रताची मांडणी
घराची जमीन ( जाडेमीठ, हळद, गोमुत्र किंवा हिंग, गुलाबपाणी ) स्वच्छकरुन घ्यावी.यानंतर स्नानकरुन, नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा सुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालुन, त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालुन पूर्वेपासून आठ दिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेऊन, त्याला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी-नाणे व आंब्याचा डहाळा घालावा, त्याव्र तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी,या दत्तपीठाच्या डावीकडे (आपल्या उजव्या हातास) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे (२ पाने, १ नाणे, १ सुपारी म्हणजे एक विडा) केळे, फळ इ. मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे.

व्रतसूत्र
श्रीअनघदत्तात्रेयांच्या मुर्तीजवळ लालदोरा (व्रतसुत्र) ठेवावा. ( व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगेसोयर्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत, व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणुन अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमी पूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे.)

व्रतपूजा
यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीअनघादत्ताचे आवाहन करावे, कलशाभोवती आठ दिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥
या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ. देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़ळ्सीपत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे.

ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः

।।अथ श्री अनघाकवचाष्टकम्।।
शिरो मे अनघा पातु,
भालं मे दत्तभामिनी।
भ्रूमध्यं योगिनी पातु,
नेत्रे पातु सुदर्शिनी ।।१।।

नासारंध्रद्वये पातु,
योगिशी भक्तवत्सला।।
मुखं में मधुवाक्पातु,
दत्तचित्तविहारिणी ।।२।।

त्रिकंठी पातु मे कंठं,
वाचं वाचस्पतिप्रिया।
स्कंधौ मे त्रिगुणा पातु,
भुजौ कमलधारिणी ।।३।।

करौ सेवारता पातु,
ह्यदयं मंदहासिनी।
उदरं अन्नदा पातु,
स्वयंजा नाभिमंडलम् ।।४।।

कमनिया कटि पातु,
गुह्यं गुह्येश्वरी सदा।
ऊरु मे पातु जंभघ्नी,
जानुनी रेणुकेष्टदा ।।५।।

पादौ पादस्थिता पातु,
पुत्रदा वै खिलं वपु:।
वामगा पातु वामांगं,
दक्षांग गुरुगामिनी ।।६।।

गृहं मे दत्तगृहिणी बाह्ये,
सर्वात्मिकाSवतु।
त्रिकाले सर्वदा रक्षेत्,
पतिशुश्रुणोत्सुका ।।७।।

जाया मे दत्तवामांगी,
अष्टपुत्रा सुतोS वतु।
गोत्रमत्रि स्नुषा रक्षेद्,
अनघा भक्त रक्षणी ।।८।।

य: पठेद अनघाकवचं नित्यं भक्तियुतो नर:।
तस्मै भवति अनघांबा वरदा सर्व भाग्यदा ।।
इति अनघाकवचाष्टकम् ।।

27/02/2019

शिव व बेल
शिवलिंगपूजनाचा खरा अर्थ
शिवलिंगाचे पूजन कसे करावे
शिवलिंग पूजनाकडे वळण्याआगोदर प्रथम शिवलिंग कसे असावे ते माहित असणे महत्वाचे आहे. बाजारात अनेक प्रकारची शिवलिंगे उपलब्ध असतात. साधारणतः संगमरवर, पितळ, पंचधातू, स्फटिक, पारद, काच यांचे बनलेले शिवलिंग वापरतात. जर आर्थिकदृष्य़ा शक्य असेल तर पारद वा स्फटिक शिवलिंग जरूर खरेदी करावे. पारद आणि स्फटिक शिवलिंग आर्थिक भरभराटीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी चांगली मानली जातात. त्यातही पारद शिवलिंग जास्त लोकप्रिय आहे. पारद शिवलिंग लोकप्रिय असण्याचे अजुन एक कारण म्हणजे पारा हा शंकराचे वीर्य असल्याचे मानले जाते. त्यामागील कथा थोडक्यात अशी...
राक्षसांकडून देवांचा वारंवार पराभव होऊ लागला. त्यामुळे त्रासून जाऊन सर्व देव ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी धावले. ब्रह्मदेवाने सांगितले की याला उपाय एकच आणि तो म्हणजे शंकराचा पुत्र. देव काळजीत पडले कारण शंकर तर सदा समाधीत. यावर उपाय म्हणून त्यांनी शंकर आणि पार्वतीला एकांतात क्रिडेकरिता पाठवले आणि आतातरी शिव-पार्वती मिलन होऊन शंकराला पुत्ररत्न होईल अशी आशा करू लागले. मदन, रति आणि वसंत ऋतु यांनाही आपला पूर्ण प्रभाव पाडण्यास त्यांनी विनवले अनेक वर्षे लोटली पण शंकर-पार्वती मिलन काही घडेना. वैराग्यशाली शंकरापुढे मदन काहीच करू शकेना. मग देवांनी अग्निला शंकर-पार्वती मिलन घडले की नाही हे पाहण्यासाठी पाठवले. अग्नि याचक बनुन तेथे गेला. मिलन घडले नाही असे कळताच त्याने शंकराजवळ इच्छित बस्तुची याचना केली. शंकर बैरागी त्याच्या जवळ याचकाला देण्यासाठी काय असणार? म्हणून अग्निने शंकराचे वीर्य मागितले. शंकरानेही पुढील भविष्यार्थ जाणून आनंदाने होकार दिला. दिलेल्या वीर्याचे तेज प्रत्यक्ष अग्निही सहन करू शकला नाही. त्याने ते गंगेत टाकले. गंगाही ते वीर्य धारण करू शकली नाही. गंगेने ते पृथ्वीवर लोटले. पृथ्वीवर आलेले ते शिववीर्य म्हणजेच पारा!
पारा हा एकमेव धातू असा आहे की जो द्रव स्वरुपात आढळतो. पार्‍याचा गन्धकाशी संयोग करून आणि त्यावर अजुनही काही जटील प्रक्रिया करून पारद बनवले जाते. पारद शिवलिंग किंमतीच्या दृष्टीने जरा महाग असते. साधारणतः ते ग्रॅमच्या भाषेत विकले जाते. छोट्या आकाराचे असली शुद्ध पारद शिवलिंग सहज चार ते पाच हजाराच्या घरात जाऊ शकते. बहुतांशी दुकानांमधे किंमतीची ही अडचण लक्षात घेऊन काहिसे अशुद्ध पारद वापरले जाते. असे जरी असले तरी उपासनेच्या दृष्टीने ते जवळजवळ सारखेच प्रभावी असते. कमी प्रतीचे पारद लवकर काळपट होते. जर ते काळपट झाले तर त्यावर लिंबाचा रस लावून कोरड्या खरखरीत कापडाने पुसावे. काळपटपणा जाऊन ते परत लखलखीत होते.
शिवलिंग मग ते कोणत्याही पदार्थाचे बनलेले असो, आपल्या स्वतःच्या अंगठ्या एवढे उंच असावे असे सांगितले जाते. जर कमी असेल तर उपासनेच्या फलात कमतरता येते. जास्त मोठे असेल तर काही हरकत नाही. पण अर्थात प्रत्येकाने आपली आर्थिक कुवत बघुन आणि तारतम्य बाळगुन याबाबतचा निर्णय घ्यावा.
नवीन शिवलिंग एकदा घरात आणले की ते उपासनेस वापरण्यापूर्वी सिद्ध करावे लागले. आजकाल या सिद्धीकरणाच्या नावाखाली फार खोटेपणा चालतो. काही दुकानदार आपण विकत असलेले शिवलिंग सिद्ध केलेले आहे असे सांगुन जास्त पैसे उकळतात. काही वेब साईटस तर सिद्ध करत असतानचे फोटो वगैरेही दाखवतात. सुज्ञ वाचकांना त्यात काय खरे आणि काय खोटे हे सांगण्याची गरज नाही. काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या पॅकिंग वरून पंचामृताने स्नान घालण्यासारखे हास्यास्पद प्रकारही घडतात. थोडे विषयांतर झाले तरी येथे एखादे यंत्र वा लिंग सिद्ध करणे म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो. जेव्हा एखाद्या कारखान्यात वा दुकानात यंत्र वा शिवलिंग बनते तेव्हा ते केवळ जड पदार्थ असते. त्यात शक्ती नसते. असे समजा की हाडामासाचा देह आहे पण प्राण नाही. त्यात उर्जा प्रस्थापित झालेली नसते. ही उर्जा कशी स्थापावी याचे एक शास्त्र आहे. त्यासाठी अत्यंत प्रबळ संकल्पशक्ती असावी लागते. कुंडलिनी जागृत असावी लागते. प्राण-संक्रमण म्हणजे काय ते माहित असावे लागते. आजकाल अनेक लोक पुस्तकांत वाचून यंत्रे सिद्ध करतात. लोकांचा असा समज असतो की काही मंत्र म्हटले आणि पूजा केली की झाले यंत्र सिद्ध! भौतीक पदार्थांनी केलेली पूजा यंत्रात प्राण कसा ओतणार? हाच प्रकार मंत्राच्या बाबतीत होतो. बहुतेक उपासक सुरवातीला तरी आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत नसतात. त्यांनी म्हटलेले चैतन्यहीन मंत्र यंत्रात शक्ती कशी ओतणार? मग साधक अपेक्षित फळ मिळाले नाही वा कमी मिळाले म्हणून तक्रार करतात. म्हणूनच प्राचीन काळी शैव दिक्षेच्या वेळी गुरू शिष्याला स्वतः सिद्ध केलेले शिवलिंग देत असत. अर्थात काहीच संस्कार न केलेल्या शिवलिंगापेक्षा अप्रगत साधकाने संस्कारीत केलेले शिवलिंग केव्हाही श्रेष्ठच ठरते.
शिवलिंग आणल्यावर त्याची जागा निश्चित करावी. घरच्या देव्हार्‍यात ठेवले तर सगळ्यात उत्तम. काही उपासक कपाट, टेबलाचा खण, साधनेची जागा अशा ठिकाणीही ते ठेवतात. कोठेही ठेवले तरी त्याचे पावित्र्य राखले जाईल, ते धुळ खात पडणार नाही याची काळजी घ्यावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवलिंगाची रोज पूजा करावी. ज्यांना काही कारणाने हे शक्य नाही त्यांनी निदान दर सोमवारी तरी ती करावी. जर आपल्याला शिवलिंगाची काळजी घेणे आणि त्याचे पावित्र्य राखणे शक्य नसेल तर शिवलिंग आणण्यापेक्षा दर सोमवारी वा जमेल तेव्हा शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शिवलिंग आणल्यावर मग त्याकडे दुर्लक्ष करून त्याचा अपमान करू नये.
अभिषेकाचासहित शिवपूजनाचा शास्त्रोक्त विधी शिवपूराणात किंवा बाजारात मिळणार्‍या पुजेच्या पुस्तकांत सहज मिळण्यासारखा आहे. पण आजच्या धावपळीच्या काळात बहुतेकांना असे विस्तृत शिवपूजन करणे शक्य होत नाही, वेळेच्या दृष्टीनेही आणि पैशाच्या दृष्टीनेही. तेव्हा येथे सर्वांना सुलभपणे करता येईल असा विधी देत आहे. ज्यांना यथाविधी पूजन करायचे असेल त्यांनी एकाद्या पुरोहिताकरवी ते करवून घ्यावे हे उत्तम.
आपल्याकडे पूजनाचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. पंचोपचार, षोडशोपचार, मानसपुजा वगैरे. त्यापैकी पंचोपचार पुजा आजच्या काळात बहुतेकांना करता येण्यासारखी आहे. पंचोपचार पुजेमध्ये पाच वस्तुंचा उपयोग केला जातो. त्या पाच वस्तु म्हणजे गन्ध, फुले, धुप, दिप आणि नैवेद्य. भारतातल्या अनेक घरांमधे रोज पंचोपचार पुजा केली जाते पण यापुजेचा खरा अर्थ फारच थोड्यांना माहित असतो. मानवी शरीर पंचमहाभुतांनी बनलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश ही ती पाच तत्वे. परमेश्वर या पाच तत्वांचा जनक असला तरी यांपासून वेगळा आहे. कुंडलिनी योगशास्त्राप्रमाणे पंचमहाभुतांचे वास्तव्य अनुक्रमे मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत आणि विशुद्धी या चक्रांपाशी आहे. या चक्रांच्या वरचे चक्र आज्ञाचक्र म्हणून ओळखले जाते. तेच शिवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. कुंडलिनी योगशास्त्रानुसार परमशिवाशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे लय वा प्रतिप्रसव. म्हणजेच पंचमहाभुतांचा लय केल्याशिवाय शिवतत्व हाती येणार नाही. पंचोपचार पुजनामधे अर्पण केले जाणारे पदार्थ प्रत्यक्षात पंचमहाभुतांचे प्रतिक आहेत. गन्ध हे पृथ्वीतत्वाचे, पुष्प हे आकाशतत्वाचे, दिप हे अग्नितत्वाचे, धुप हे वायुतत्वाचे आणि नैवेद्य हे जलतत्वाचे प्रतिक आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराला गन्ध, फुले वाहता वा निरांजनाने ओवाळता तेव्हा आपला पंचमहाभुतात्मक देह परमेश्वराच्या चरणी अर्पण करत आहोत ही भावना हवी. कुंडलिनीयोग साधकाने हीच भावना त्या त्या चक्राच्या शुद्धीबद्दल बाळगावी. केवळ यांत्रिकपणे गन्ध-फुले वाहण्यापेक्षा या समर्पणाच्या भावनेने पुजा केली तर शतपटीने अधिक फायदा मिळेल. असो तर आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू.
प्रथम आणलेले शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवावे. बाजारातून आणलेले शिवलिंगा अनेकदा हाताळल्याचे ठसे, रंग, माती इत्यादी गोष्टींनी मलिन झालेले असते. म्हणून ते सर्वप्रथम स्वच्छ करावे. यासाठी गंगाजल वापरता आले तर उत्तमच. त्यानंतर शिवलिंगाला पंचामृताने (दुध, दही, तुप, मध, साखरपाणी) स्नान घालावे. मग परत गंगाजलाने शिवलिंगाला स्नान घालावे. पंचामृताने आलेला ओशटपणा आणि चिकटपणा जाईल याची काळजी घ्यावी. त्यानंतर शिवलिंग देव्हार्‍यात वा तबकात ठेवावे. मग खालील मंत्र म्हणत पंचोपचार पुजा करावी.
ॐ लं पृथिव्यात्मकं गन्धं परिकल्पयामि।
असे म्हणत शिवलिंगाला गंध लावावे. मनात आधी सांगितल्याप्रमाणे समर्पणाचा भाव ठेवावा.
ॐ हं आकाशात्मकं पुष्पं परिकल्पयामि।
असे म्हणत शिवलिंगाला फुले आणि बेलाची पाने वहावीत. बेलाचे पान तम, रज आणि सत्व या त्रिगुणांचे प्रतीक आहे. फुले शक्यतो पांढर्‍या रंगाची असावीत. पांढरा रंग निर्मळ, निरंजन परमात्याचे प्रतिक आहे.
ॐ यं वाय्व्यात्मकं धुपं परिकल्पयामि।
असे म्हणत धुप वा अगरबत्ती लावावी. कृत्रिम रसायनांनी बनवलेल्या अगरबत्तीपेक्षा धुप, लोबान वा गुग्गुळ वापरणे चांगले.
ॐ रं वह्न्यात्मकं दीपं दर्शयामि।
असे म्हणून निरांजन ओवाळावे. निरांजनात शक्यतो गाईचे तुप वापरावे.
ॐ वं अमृतात्मकं नैवेद्यं निवेदयामि।
असे म्हणत नैवेद्य दाखवावा.
ॐ सौं सर्वात्मकं सर्वोपचारं समर्पयामि।
असे म्हणत मनानेच आपले सर्वस्व श्रीशंकराच्या चरणी अर्पण करत आहोत अशी भावना ठेवून नमस्कार करावा.
(कुंडलिनी योगसाधकांनी पंचतत्वांचे बीजमंत्र आणि चक्रांचे बीजमंत्र यांतील साधर्म्य लक्षात घ्यावे)
जर मंत्र म्हणणे काही कारणाने शक्य नसेल तर एकामागून एक नुसते उपचार अर्पण करावेत. जर फुले, धुप, दीप इत्यादी गोष्टी काही कारणाने उपलब्ध नसतील तर केवळ मनानेच मंत्र म्हणत तो तो उपचार अर्पण करत आहोत अशी भावना ठेवावी. मनोमन पुजनात काही कमतरता राहिली असेल तर त्याबद्दल क्षमायाचना करावी.
वरीलप्रकारे पूजन झाल्यानंतर शिवलिंगासमोरच साधनेचे आसन टाकावे. येत असल्यास प्रथम दहा-बारा वेळा नाडिशोधन प्राणायाम करावा. जर आपण कुंडलिनी योगमार्गावरचे प्रगत साधक असाल तर सुषुम्ना चालु करावी (ती कशी करावी ते शब्दात सांगण्याचा विषय नाही). तदनंतर पंचाक्षर मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र कमीतकमी 108 वेळा रुद्राक्षाच्या माळेवर म्हणावा. अकरा माळा जमल्यास उत्तम. माळ नसेल तर घडाळ्यावर मोजून तो म्हणवा. मंत्र म्हणत असताना शिवलिंगाकडे एकाग्रचित्ताने पहात शिवतत्व आपल्यावर प्रसन्न होत आहे अशी भावना ठेवावी. मंत्रजप पूर्ण झाल्यावर परत नाडिशोधन प्राणायाम करावा. त्यानंतर डोळे मिटून शिवध्यान करावे वा अजपा ध्यान करावे. आसनावरून उठण्यापूर्वी शंकराचे एखादे स्तोत्र म्हणावे आणि मग उठावे.
पंचामृताने स्नान रोज घालण्याची गरज नाही पण निदान शिवरात्रीच्या दिवशी घालावे. वरील संपूर्ण विधी रोज करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या कुवतीनुसार जेवढे जमेल तेवढे करावे. पुजनाने भक्तीवर्धन झाले पाहिजे हे लक्षात ठेवावे. केवळ यांत्रिकपणे पुजन करून काही उपयोग नाही.शंकराचे एक नाव आशुतोष अर्थात भक्तावर लवकर प्रसन्न होणारा असे आहे तेव्हा मनात भक्ती असेल तर सदाशिव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.

श्रीशंकराचे पवित्र प्रतीक - शिवलिंग
साधारणतः साधक आपल्या उपास्य दैवताच्या पुजाअर्चनेसाठी मुर्ती अथवा तसबीर वापरतात. श्रीशंकराची उपासना मात्र सगुण आणि निर्ग़ुण अशा दोन्ही रुपात केली जाते. शिवशंकराची मुर्ती वा तसबीर शिवोपासनेत सगुण प्रतीक म्हणून वापरली जात असली तरी खर्‍या अर्थाने शिवलिंग हेच शंकराचे प्रतीक मानले जाते. बहुतेक सर्व शिव मंदिरांमधे शिवलिंगाच्या निर्ग़ुण प्रतीकाच्या माध्यमातूनच शंकराची पूजा केली जाते. शंकराची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्धच आहेत. शिवलिंगाचा अर्थ काय, त्याचा उगम कसा झाला, त्याचे पूजन कसे करावे या विषयी शिवपुराणामधे सविस्तर वर्णन आढळते. त्या आधारानेच आपणही या गोष्टी जाणून घेणार आहोत...
सृष्टीच्या आरंभापूर्वी सर्वकाही निर्ग़ुण निरामय ब्रह्मच होते. हे ब्रह्म सत्य, ज्ञानस्वरूप, आधाररहित, निर्विकार, निराकार, निर्ग़ुण, योहिगम्य, सर्वव्यापी, निर्विकल्प, निरारम्भ, मायाशून्य, उपद्रवरहित, अद्वितीय, अनादी, अनंत, संकोच-विकास रहित आणि चिन्मय असे एकटेच पहुडले होते. हे ब्रह्म शैव दर्शनात परमशिव म्हणूनही ओळखले जाते. अशा या निर्ग़ुण ब्रह्मतत्वाच्या मनात आपण अनेक व्हावे अशी इच्छा निर्माण झाली. त्याबरोबर ते निर्ग़ुण तत्व सगुण झाले आणि सदाशिवाच्या रूपात प्रगट झाले. सदाशिवाने आपल्याच इच्छेने शक्तितत्वाची निर्मीती केली. शिव आणि त्याची शक्ती क्षणभरसुद्धा एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. जेथे शिव तेथे शक्ती आणि जेथे शक्ती तेथे शिव असा प्रकार आहे. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. या शक्तीलाच जगदंबा, अंबिका, प्रकृती, सर्वेश्वरी, त्रिदेवजननी, नित्या, मूलकारण अशा अनेक नावांनी ओळखले जाते. शिव आणि शक्ती आपल्याच लीलेने क्रिडा करू लागले.
क्रिडा करत असताना त्यांच्या मनात आले की आता अजूनही सृष्टी निर्माण करावी. पण सृष्टीनिर्मीतीच्या कार्यामुळे आपल्या क्रिडेत भंग यायला नको म्हणून अन्य कोणाची तरी नियुक्ती या कामी करावी असे उभयतांनी ठरवले. त्यानुसार सदाशिवाने आपल्या डाव्या अंगातून एका तेजस्वी पुरुषाची निर्मीती केली. त्या तेजस्वी पुरुषाला शिवाने विष्णु असे नाव दिले. जगाची रचना करण्याचे ज्ञान विष्णुला मिळावे म्हणून शिवाने स्वासावाटे वेद विष्णुला प्रदान केले. त्यानंतर विष्णु कठोर तप करू लागला. तपस्येच्या श्रमाने त्याच्या शरीरातून घाम अर्थात जलधारा वाहू लागल्या. सर्वत्र ते जल भरून राहिले. थकलेल्या विष्णुने त्यातच दिर्घकाळ निद्रा घेतली. जल शब्दाला एक प्रतिशब्द आहे 'नार' आणि त्यात शयन करणारा तो 'नारायण'.
नारायण निद्रेत असताना सदाशिवाच्या इच्छेने त्याच्या नाभीतून एका कमळाचा उद्भव झाला. ते कमळ अतिशय सुंदर होते. तेजस्वी आणि प्रकाशमान होते. त्या कमळावर शिवइच्छेनुसार ब्रह्मदेवाचा जन्म झाला. विष्णुची उत्पत्ती शिवाच्या डाव्या अंगातून झाली तर ब्रह्मदेवाची उजव्या अंगातून. जन्म झाल्याबरोबर ब्रह्मदेवाला आपण कोठून आलो? आपले कार्य काय? असा प्रश्न पडला. आपला जन्म या कमळातून झाला आहे तेव्हा या कमळाचे मुळ शोधले पाहिजे असे समजून ब्रह्मदेव कमळाच्या मुळाशी पोहोचला. त्याला असे दिसले की ते कमळ विष्णुच्या नाभीतून प्रसवलेले आहे. विष्णुने ब्रह्मदेवाला पाहिले आणि ब्रह्मदेवाने विष्णुला. दोघांनीही एकमेकांना प्रणाम केला. विष्णुने ब्रह्मदेवाला 'मुला' असे संबोधताच ब्रह्मदेवाला राग आला. दोघांमधे मी श्रेष्ठ की तु श्रेष्ठ असे भांडण सुरू झाले. बराच काळ भांडण सुरू होते पण वादाचा निकाल काही लागेना. त्याचवेळेस त्या दोघांमधे एक अत्यंत तेजस्वी अग्निस्तम्भ प्रगट खाला. दोघांनाही हे कळेना की आपल्या भांडणात हा तिसरा कोण आला. तो अग्निस्तम्भ अतिशय विशाल होता. त्याची सुरवात आणि शेवट कोठे आहे हेच त्या दोघांना कळत नव्हते. तेव्हा त्यानी असे ठरवले की ब्रह्मदेवाने स्तंभाच्या वरच्या भागाचा उगम शोधावा आणि विष्णुने खालच्या भागाचा. त्यानुसार दोघेही त्या अग्निस्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यासाठा वेगाने निघाले. बराच काळ व्यतीत झाला पण त्या स्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यात त्यांना अपयश आले. अत्यंत थकून दोघेही आपापल्या मुळ जागी परत आले. त्यांना कळले की ना विष्णु श्रेष्ठ आहे ना ब्रह्मदेव. त्यांनी त्या अग्निस्तंभाला भक्तीभावाने नमस्कार केला आणि प्रार्थना केली 'हे महाप्रभो! आपण कोण आहात ते आमच्या आकलनापलिकडचे आहे. कृपया आपली यथार्थ ओळख द्या'. या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे अवतीर्ण झाले. सदाशिव म्हणाले, "मी सृष्टीकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहे. निर्ग़ुण आहे आणि सगुणही. सत-चित-आनन्द हे माझे खरे रूप आहे. विष्णु माझ्या डाव्या अंगापासून निर्माण झाला आहे तर ब्रह्मा उजव्या अंगापासून. माझ्या आज्ञेने ब्रह्माने सृष्टीच्या निर्मीतीचे कार्य करावे तर विष्णुने पालनाचे. सृष्टीचा संहार करण्याचे काम माझाच प्रत्यक्ष अंश रुद्र रूपाने करेन. रुद्र ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटी मधून प्रगटेल." असे सांगून शिव अंतर्धान पावला. शिवाज्ञा शिरसावन्द्य मानून ब्रह्मा आणि विष्णु आपापल्या नेमून दिलेल्या कार्यात मग्न झाले. विष्णु आणि ब्रह्मदेवाच्या वादाच्यावेळी जो अग्निस्तंभ प्रगट झाला तो म्हणजेच शंकराचे पवित्र शिवलिंग आणि शिवलिंग ज्या दिवशी प्रगट झाले तो दिवस म्हणजेच शिवरात्रीचा पावन दिवस!
नाथयोग शिरोमणी श्रीगोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध-सिद्धांत पद्धती नामक ग्रंथात (जो नाथ पंथाचे तत्वज्ञान विशद करणारा अतिशय महत्वाचा प्रमाण ग्रंथ आहे) एकटे शिवतत्वच या जगदनिर्मीतीला कसे कारणीभूत आहे ते सांगताना शिव ते ब्रह्मदेव ही स्थुल उत्क्रांती शिव - भैरव - श्रीकंठ - सदाशिव - इश्वर - रुद्र - विष्णु - ब्रह्मदेव अशा प्रकारे दिली आहे. येथे रुद्र शिवतत्वाचा प्रत्यक्ष अंश असल्याने विष्णुच्या आधी आला आहे हे लक्षात घ्यावे.
कुंडलिनी योग साधकांनी येथे काही गूढ संकेत लक्षात घ्यावेत. शंकराने विष्णुला वेद स्वासातून देणे आणि अजपा साधनेचे शैव दर्शनातील महत्व हा दुवा महत्वाचा आहे. तसेच शिव-शक्ती अभिन्नत्व आणि योगग्रंथातील 'मुलाधारात शिवच शक्तीरूपात राहतो' अशा सारखे श्लोक एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे सांगत आहेत हे लगेच समजण्यासारखे आहे. षटचक्रांमधे स्वयंभू, बाण इत्यादी शिवलिंगांची केलेली कल्पनाही महत्वाची आहे. योगशास्त्रानुसार स्वाधिष्ठान चक्रात ब्रह्मदेवाची, मणिपूरात विष्णुची आणि अनाहत चक्रात रुद्राची केलेली कल्पनाही महत्वाची आहे. ब्रह्मदेवाचे निर्मीतीचे कार्य आणि प्रजनन इंद्रियांचा जवळचे स्वाधिष्ठान चक्र, विष्णुचे पालनाचे कार्य आणि मणिपुर चक्राचे उदरसंस्थेवरचे नियंत्रण, रुद्राचा संहार आणि हृदयातील षडरिपूंचा आणि भौतिक भावभावनांचा नाश, रुद्राचे भ्रुकुटीमधून प्रगटणे आणि आज्ञा चक्राचे महत्व या सर्वच गोष्टी एकमेकाशी अगदी चपलख जोडता येतात. असो.
ही झाली शिवलिंगामागची पौराणिक कथा. आता शिवलिंगाच्या तात्वीक आणि आध्यात्मिक अर्थाकडे वळू. तुम्ही कोणत्या न्या कोणत्या देवळात शिवलिंग पाहिलेच असेल. शिवलिंगाचे दोन भाग असतात. एक जो उभट स्तंभासारखा दिसतो तो आणि दुसरा जो पसरट दिसतो तो. पहिला भाग म्हणजे लिंग आणि दुसरा भाग म्हणजे योनी. या दुसर्‍या भागाला पीठ, वेदिका, जलधारा, जलहरी असेही म्हणतात. येथे लिंग आणि योनी म्हणजे शरीरावयव नव्हेत तर त्यांना शैव दर्शनामधे एक गूढ सांकेतीक अर्थ आहे. शिवपुराणातच हा अर्थ विषद करण्यात आला आहे.
लिंगमर्थं हि पुरुषं शिवं गमयतीत्यदः।
शिवशक्त्योश्च चिन्ह्यस्य मेलनं लिंगमुच्यते॥
याचा अर्थ असा की शिवलिंगामधील लिंग म्हणजे शिव आणि योनी म्हणजे शक्ती. अर्थात शिवलिंग शिवशक्ती यांचे मिलन आणि एकता दर्शवते. लिंग म्हणजे वैश्वीक पुरुषतत्व आणि योनि म्हणजे वैश्वीक स्त्रीतत्व अर्थात प्रकृती. शैव मतानुसार ही सारी सृष्टी शिव आणि शक्ती यांचा खेळ आहे. शिव आणि शक्ती एकमेकाहून भिन्न राहुच चकत नाहीत. किंबहुना शिव आणि शक्ती हे खरेतर भिन्न नाहितच तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यालाच अद्वयवाद असे म्हटले जाते. अर्धनारीनटेश्वर या अद्वयवादाचेच प्रतीक आहे. आपल्याकडे पत्नीला अर्धांगीनी म्हटले जाते ते याच अर्थाने. संसाराचा गाडा दोघांनी एकत्र ओढल्याशिवाय चालूच शकत नाही हे त्यातून अभिप्रेत असते. अद्वयवाद अद्वैतवादापेक्षा भिन्न कसा याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही पण थोडक्यात सांगायचे तर अद्वैतवादात शक्ती वा माया हीचे अतित्वच नसते. ती दोरीवरील सर्पाच्या आरोपाप्रमाणे मित्थ्या मानली जाते. अद्वयवादात मात्र परमेश्वर आणि त्याची शक्ती हे दोनही सत्य असून त्यांचे नाते चन्द्र आणि चांदणे, दिप आणि प्रकाश यांच्यासारखे अभिन्नत्वाचे असते. भगवत गीतेतही हेच तत्व थोड्या निराळ्याप्रकारे सांगितले आले. गीता 'पुरुष आणि प्रकृति ही अनादी तत्वे आहेत' असे ठामपणे सांगते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात :
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन गर्भं दधाम्यहम।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत॥
शिव जन्म कसा झाला ? सृष्टीचा मारता जो ब्रम्हदेव त्याला चार पुत्र होप्ते. सृष्टीच्या निर्मितीनेन्तर ब्रम्हदेवाने आपल्या पुत्रांस विनंती केली कि , हे पुत्रानो तुम्ही आता योग्य वयाचे झाला आहात; तेव्हा प्रजोत्पाद्नाचे कार्य हाती घ्य. त्या चोघानीही त्यास नकार दिला प्रत्यक्ष मुलांनी आपली आज्ञा मोडली , हे पाहून ब्राम्ह्देवाना अतिशय संताप आला. राग बाहेर पडू लागला . क्रोध वाडू लगल. त्या क्रोधातूनच एक बालक बाहेर पाप्डलेले ब्राह्न्देवास दिसले. जन्मत:च ते बालक जोरजोराने रडू लागले . समोर असणार्या ब्रह्मदेवास त्याने विचारले , 'माझे नाव काय? माझे कार्य काय ? ' तेव्हा ब्रम्हदेव त्यास म्हणाला ,' हे बालका , शांत हो ! जन्माला आल्याबरोबर तू र्द्न्यास प्रारंभ केलास, त्यामुळे तू 'रुद्र ' म्हणूनच ओळखला जाशील. आकाश , वायू, जल, सूर्य, अग्नी , तण या ठायी तुझे वास्तव्य राहील.
शिव व बेल :
भारतीय पूजा विधीमध्ये निरनिराळ्या वृक्षांना महत्व देण्यात आले आहे. गणपतीला दुर्वा प्रिय आहेत , तर कृष्णाला व श्रीविष्णूला तुळस प्रियं आहे. त्याच प्रमाणे शिवाला बेल फार प्रिय आहे. बेलाच्या झाडाच्या मुळाशी, शंकराचे लिंग स्थापन करून जो त्याचे पूजन करतो, त्याच्या बाबतीत काल्यांकारक अशाच घटना घडतात. जी व्यक्ती शिवलिंगावर अबुइशेक घालते त्या व्यक्तीस सर्व तीर्थांच्या स्नानाचे फळ मिळते. बेल वाहताना म्हणावयाचा मंत्र :

त्रिदल त्रिगुणाकारं त्रिनेत्र च त्र्यायुध ।
तरी जन्म्पापसहारम एकं बिल्व शिवार्पणम ।।

शिवरात्र महात्म्य :
शिवाच्या उपासानांपैकी महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्याला प्रत्येक सोमवारी उपवास करणे जमत नाही त्याने श्रावण महिन्यातले तरी उपवास करवेत. हे करणेसुद्धा ज्याला जमत नाही त्याने महाशिवरात्रीचा उपवास तरी करावा. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीस शिवरात्र असतेच, पण माघ महिन्यातल्या शिवरात्रीस महाशिवरात्र म्हणतात. शिव पुअरनत याचे महात्म्य वर्णन केले आहे. शिवरात्रीने शिव अधिक संतुष्ट होतो. तेंव्हा मोक्ष व भोग इच्छिनाऱ्या साधकाने हे शिवरात्र व्रताच करावे.

शिवाचे अवतार : दुर्वासावतार , हनुमान अवतार , व्दिजेश्वर अवतार , यातीनाथांचा अवतार, कृष्णदर्शन अवतार, अवधुतेश्वरावतार, भिक्शुवार्यावतार
शिव पूजा :
शिवोपासनेत शिवाची लिंगरुपानेच पूजा करतात. ॐ नम: शिवाय या मंत्राने पूजन करतात; कारण या मंत्राने धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचा लाभ होतो. सर्व लोकांवर कृपा करण्यासाठी शिव शिवलिंगातच वास्तव्य करून राहिला आहे, असे पुराणात सांगितले आहे. शिव लिंग पूजनामुळे मोक्ष व भोग प्राप्त होते. पूजेसाठी सोवळे अथवा धूत वस्त्र नेसावे . उतरेकडे तोंड करून बसावे व प्रार्थना करावी, ' हे महादेव, आज मी तुझी पूजा यथाविधी यथाशक्ती करणार आहे, ती गोड मानून घे. मी अज्ञानी आहे माझ्या हातून चूक झाली तर मला माफ कर. ' शिवाची अशी पूजा केल्यानंतर पूजेच्या जागी शिवलिंग ठेवावे. नंतर १०८ वेळा नम: शिवाय! या मंत्राचा जप करावा. आता त्या लिंगाच्या ठिकाणी शिवाने वास्तव्य केले आहे असे मानून पुढील मंत्र म्हणून शिवाची पंचामृताने पूजा करावी.
ॐ शिवाय नम: पाधं समर्पयामी |
ॐ महेश्वराय नम: अर्घ्यं समर्पयामी ||
ॐ शंभवे नम: अर्घ्यान्ते आचमनियं समर्पयामी |
पनचम्रुतं मयनितं पेयादधीघृत मधु शर्करा च समायुक्तं स्नानार्थ प्रतीग्रह्यतां ||

एवढे म्हणून दुध , दही तूप, मध व साखर यांनी शिवास स्नान घालावे. त्यानंतर 'ॐ पार्थिवेश्व्राय पुष्पांजली समर्पयामी' असे म्हणून फुले वाहावीत व ती स्वीकारण्याची विनंती शिवास करावी. त्यानंतर शिवाची प्रार्थना करावी. ज्यांना प्रार्थना म्हणता येणार नाही, त्यांनी असे म्हणावे , ' हे महेश्वर , तू मला रूप, विजय, सॉभाग्य, पुत्रपौत्र, धनधान्य , आदी सर्वांच्या प्राप्तीसाठी मदत कर. ' यानंतर नम: शिवाय !' या मंत्राचा एकचित्ताने १ ० ८ वेळा जप करावा.
नंतर गंध, पुष्प अर्पण करून शिवाची आरती करावी. यानंतर हातात अक्षदा घ्याव्या व त्या शिवलिंगावर अर्पण करून , पूजेचे विसर्जन करावे.
" मृदः कोटीगुणं स्वर्ण स्वर्णात्कोटि गुणं मणि। मणेः कोटीगुणं बाणो बाणात्कोटी गुणं रसः स्वात्परतरं लिंग नभूतो न भविष्यति ।। "
" रसलिंग महालिंगम शिवशक्ती निकेतम । लिंग शिवालय प्रोक्त सिद्धींद सर्व देहीनाम ।। योग शिखोपनिशद रसलिंग (पारदलिंग) हे महालिंग आहे। याला शिवशक्तीचे घर (शिवालय) म्हणू शकतात। हे प्राप्त होण्याने सर्वसिद्धी प्राप्त होतात मग त्या अध्यात्मिक असो की भौतीक सर्व प्राप्त होवून सर्व इच्छा पूर्ण होतात। अभ्रकं तव बिजं तु मम बिजं तु पारदः । बद्धो पारद लिंगो यं मृत्यू दारिद्रय नाशनम्‌ ।। सर्वदर्शन संग्रह।

Address

Yogesh D Thorat (Advocate) BJ/13 Thakkar Buzzr's, New C B S, Nashik 2, Mob No . 9850413119; 9326889727;
Nashik
422002

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 2pm

Telephone

+919850413119

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh D Thorat Astrologer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share