06/10/2021
*प्रकरण पाहिले*
*पहिली खबर*
फौजदारी कारवाई दोन प्रकारे सुरू करण्यात येते
१.पोलिसांकडे एफआयआर लिहून (कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता )
२.मॅजिस्ट्रेटकडे खाजगी फिर्याद देऊन (कलम १९०, १५६-३,२०२फौजदारी प्रक्रिया संहिता )
यापैकी पहिल्या प्रकारामध्ये फक्त दखलपात्र गुन्हे उदाहरणार्थ मडर, रेप ,चोरी ,मारामारी इत्यादी गंभीर स्वरुपाचा गुन्ह्यांचा समावेश होतो.
एसआयआर किंवा पहिल्या खबरची व्याख्या जरी कायद्यामध्ये दिलेली नसली तरी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोन ड मध्ये दिलेली आहे.
थोडक्यात पहिली खबर म्हणजे वेळेच्या दृष्टीने सर्वप्रथम पोलिस ठाण्यांमध्ये ठाणे अंमलदाराकडे दिलेल्या दखलपात्र गुन्ह्याची खबर होय.
मग असा गुन्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असो किंवा पोलिस ठाण्यांच्या हद्दीच्या बाहेर घडलेला असो.
तसेच खबर देणारा हितसंबंधी व्यथित असो किंवा नसो
अशी खबर लेखी अथवा तोंडी देता येते
अशा पहिल्या खबरीमध्ये बारीकसारीक तपशील असला किंवा नसला तरी चालते
*कायदेशीर बाजू*
१.ठाणे अंमलदाराकडे पहिली खबर गुन्ह्याची तोंडी दिल्या असत्या ठाणे अंमलदाराने ती लिहून काढावि.
२.ठाणे अंमलदाराने पहिली कबर लिहून काढल्यानंतर ती फिर्यादीला वाचून दाखवावी व फिर्यादीची सही घ्यावी.
३.पहिल्या खबर बुकांमध्ये ठाणे अंमलदाराने नमुने प्रमाणित लिहून नोंद करावी
४.नंतर पहिल्या खबर ची नक्कल विनामूल्य फिर्यादीला द्यावी
५.पहिल्या खबरची एक नक्कल ताबडतोब मॅजिस्ट्रेटकडे पाठवावी .
*पहिली खबर देताना फिर्यादीने काय लक्षात घ्यावे*
१. खबर देणारा घाबरलेला असेल त्यांनी सर्वप्रथम स्वत ला शांत करावे.
२.घटनेबद्दल माहिती असलेली सर्व माहिती ठाणे अंमलदाराला नि संकोच सांगावी.
३. घटना येथे घडली आहे तिथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये किंवा हात लावल्या असल्यास त्याबद्दल माहिती ठाणे अंमलदाराला द्यावी
४.त्याला ही माहिती कशी मिळाली त्याबद्दल ठाणे अंमलदाराला सांगावे.
५. ठाणे अंमलदार फिर्याद लिहीत असताना कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे की नाही याची खात्री करावी.
६.फिर्याद लिहून झाल्यानंतर ठाणे अंमलदाराने फिर्याद वाचल्यानंतर काय राहिले असल्यास ते अॅड करण्याची ठाणे अंमलदाराकडे विनंती करावी.
७ फिर्यादीची एक प्रत ठाणे अंमलदारांकडून मागून घ्यावी.
८.पहिल्या कबरीमध्ये ठाणे अंमलदाराने खबर देणारे चे नाव होय व्यावसाय पत्ता लिहिला आहे की नाही हे तपासून पाहावे.
९.गुन्हा घडला त्याची तारीख वेळ ठिकाण लिहिले आहे की नाही हे तपासून पाहावे.
१०.आरोपीचे नाव माहीत असल्यास त्याचे नाव फिर्यादीमध्ये लिहावे, माहीत नसल्यास अज्ञात इसम म्हणून फिर्यादीमध्ये नाव लिहावे आणि अज्ञात इसमाची वर्णन करावे माहिती असल्यास.
११.साक्षीदारांची नावे फिर्यादीमध्ये सांगावी व साक्षीदारांकडून त्यांची साक्ष नोंदवली गेली आहे की नाही याबद्दल माहिती घ्यावी .
१३.दुखापतींमध्ये वापरले गेलेले हत्यार त्याचे वर्णन करावे
१४. मालमत्तेच्या गुन्ह्यांत मालाचे , आकार, वजन ,किंमत इत्यादी चे वर्णन करावे. तसेच खुणा, चिन्ह यांचेदेखील वर्णन करावे
१५.नकारात्मक मजकूर फिर्यादीमध्ये लिहू नये.
१६.फिर्याद देण्यास विलंब झाला असल्यास फिर्याद देण्यास विलंब का झाला आहे त्याचे कारण लिहावे
*पहिली खबर पोलिसांनी न घेतल्यास*
पहिली खबर स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जाऊन देता येते परंतु पोलिसांनी लिहून घेण्यास नकार दिल्यास
१.ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांची भेट घ्यावी
२.एसीपी, डीसीपी, सीपी, एसपी, यांना आणि त्या पोलिस ठाण्याला लेखी तक्रार द्यावी.
२.लेखी तक्रार घेण्यास नकार दिल्यास ताबडतोब पोस्टाने लेखी तक्रार पाठवावी.
३ फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ -३ प्रमाणे न्यायदंडाधिकारी यांच्याकडे एफआयआर रजिस्टर्ड करण्याकरता अर्ज करावा.
*पहिल्या खबर चे महत्त्व*
पहिली खबर खूप काळजीपूर्वक लिहिणे आवश्यक आहे.
काही विशिष्ट परिस्थितीत पहिल्या कबरीला पुराव्याचे रूप देता येते.
कोर्टात साक्ष देताना फिर्यादी किंवा साक्षीदार उलटले पहिली खबर ही च्या आधारे आणि वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी आणि साक्षीदारांची उलटतपासणी सरकार पक्ष घेते
३फिर्याद दिल्यानंतर कोर्टात केस चालू होण्याकरिता बराच वेळ जातो त्या कामे फिर्यादी नेगी दिलेली साक्ष आहे ती घटना कशी घडली याचा इत्थंभूत माहिती त्यामध्ये असल्याकारणाने ती घटना पुन्हा फिर्यादी आणि साक्षीदारांना आठवून सांगण्यास मदत होते
पोलिसांना तपास करण्यास सुरवात करण्याकरता पहिली खबर अत्यावश्यक असते
फिर्याद दिल्यानंतर साक्षीदार घटनास्थळ यांचे पंचनामे करणे या कामी पहिली खबर अत्यंत मौल्यवान आहे
*पहिली खबर देताना खास सूचना आणि खबरदारी*
१.पहिली खबर त्वरित लवकरात लवकर लिहून द्या उशीर टाळा म्हणजे संशय वाढणार नाही
२.पहिली खबर साध्या सोप्या भाषेत द्या शक्यतो फिर्यादी ज्या भाषेत बोलतो त्या भाषेतच लिहावी
३.अतिशयोक्ती कल्पना मोघम विधाने पहिल्या खबरीमध्ये मध्ये टाळावी
४. पहिल्या कबरीमध्ये घटनेची वेल अत्यंत महत्त्वाची असते
५.फिर्यादीमध्ये खाडाखोड टाळा
६.एकदा पहिली खबर लिहिली की कोणत्याही कारणाने ती रद्द करता येत नाही
७गुन्हा घटना घडलेल्या जागेपासून पोलिस ठाणे किती अंतरावर आहे हे खबरी मधील लिहाव.
८पहिली खबर देऊन घेण्याचे नाकारले अगर लिहून घेऊन त्याचे गांभीर्य कमी करणे म्हणजेच मोठा गुन्हा घडलेला असताना पुण्याचे स्वरुप साधे दाखवणे दोषास पद गुन्हा आहे असे करणाऱ्या पोलिस अधिका यांवर भारतीय दंड संहिता कलम १६६. १६७. २१७. २१८ गुन्हा नोंद करता येतो.व त्याला त्यामध्ये दोषी आढळल्यास शिक्षा होते.तसेच डिपार्टमेंटल इन्क्वायरी त्याच्यावरती लागून त्याला सस्पेंड केले जाते.
येणेप्रमाणे आजचे पहिले प्रकरण समाप्त
-वि. वा. येलवे
वकील उच्च न्यायालय मुंबई
८८९८३४३२८९
*जनहिता करता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून शेअर करु शकता.*
#कायदा #महाराष्ट्र #समाजकल्याण #मराठीसाहित्य