14/02/2026
*⚖️आंतरराष्ट्रीय मानव अधिकार रक्षक मंच,*
*** जाहीर निवेदन***
प्रति,
1)पोलीस प्रशासन अधिकारी (मनमाड)
2)अप्पर पोलीस अधिक्षक साहेब (मालेगाव)
3) मा. आमदार साहेब (नांदगाव)
4)PWD विभाग अधिकारी साहेब (मनमाड)
5) मनमाड नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब
विषय: येवला–मनमाड मार्गावरील सततच्या ट्रॅफिक जाम बाबत तात्काळ उपाययोजना करण्याबाबत.
महोदय,
येवला–मनमाड मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी तसेच कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा आपत्कालीन सेवा सुद्धा अडकून पडतात, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
सदर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष करू नये. वाहतूक नियोजनाचा अभाव, अवजड वाहनांची अनियमित पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे व अपुरी वाहतूक व्यवस्था ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत.
म्हणून आपणास विनंती आहे की:
संबंधित ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्यात यावेत.
अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करावी.
अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व पर्यायी मार्ग निश्चित करावा.
सीसीटीव्ही व सिग्नल व्यवस्था सुरू करावी.
सदर समस्येवर तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांच्या भावना तीव्र होतील याची नोंद घ्यावी.🚨 मनमाड राष्ट्रीय महामार्ग (पुणे–इंदोर) : वाहतूक कोंडी की मृत्यूचा सापळा ? 🚨
दिनांक 25/01/2026 रोजी व दि. 14/02/2026 मनमाड राष्ट्रीय महामार्ग (पुणे–इंदोर) वरील वाहतूक कोंडीचे फोटो व व्हिडीओ पाहता मनमाडच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच जळजळीत प्रश्न निर्माण होत आहे—
❓ हा महामार्ग अजून किती निष्पाप तरुणांचे आणि कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे जीव घेणार?
❓ अजून किती कुटुंबांना रस्त्यावर आणून बेघर व बेसहारा करणार.?
पुणे–इंदोर महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात घडले आहेत.
या अपघातांत—
अनेकांनी आपले प्रियजन गमावले,
*अनेक तरुण अपंग झाले,*
*तर अनेक कुटुंबांचे संपूर्ण* *आयुष्य उद्ध्वस्त झाले.*
या गंभीर विषयावर
🔹 विविध राजकीय पक्ष,
🔹 सामाजिक कार्यकर्ते,
🔹 नागरिक संघटना
यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशन तसेच PWD विभागाला अनेक निवेदने दिली आहेत.
मा. आमदार साहेब सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड–नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी उल्लेखनीय काम करून चित्र बदलले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
तरीही प्रश्न असा आहे की—
❓ हा महामार्गाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिवेशनात मांडूनसुद्धा आजतागायत का सुटलेला नाही?
🚔 वाहतूक कोंडी होत असताना पोलीस रस्त्यावर का दिसत नाहीत?
🚔 पोलीस फोर्स कमी आहे हे कारण आहे का?
🚔 की यामागे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे?
❗ खरा प्रश्न जबाबदारीचा आहे ❗
अपघात झाल्यानंतर नेहमी वाहनचालकावर गुन्हा दाखल होतो.
मात्र—
❓ रस्त्याची अवस्था, नियोजनाचा अभाव, वाहतूक नियंत्रण न करणे, पर्यायी मार्ग न देणे — याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा का दाखल होत नाही?
अपघात, अपंगत्व, मृत्यू —
याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी नेमकी कोणाची?
⚖️ कायदेशीर लढ्याची तयारी करून
या गंभीर प्रकरणाची दखल घेत
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार रक्षक मंच
यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. उल्हास डफळे यांनी दिल्ली हायकोर्ट व सुप्रीम कोर्टचे वरिष्ठ वकील
मा. श्री मैनी सर (Legal Advisor) यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे.
🔔 इशारा स्पष्ट आहे —
जर पुढील ८ दिवसांत
✔️ पर्यायी मार्ग,
✔️ वाहतूक नियंत्रण,
✔️ वाहतूक कोंडीचा ठोस उपाय
यावर कारवाई झाली नाही, तर—
येवला–मालेगाव, चांदवड, नांदगाव व मनमाड परिसरात
🛑 अपघातात अपंगत्व आलेले नागरिक
🛑 मृत्यूमुखी पडलेले नागरिक
यांचे ठोस पुरावे घेऊन पुढील ठिकाणी कागदोपत्री धाव घेतली जाईल—
1️⃣ दिल्ली मानव अधिकार आयोग
2️⃣ महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग
3️⃣ मा. श्री नितीन गडकरी साहेब (केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री)
4️⃣ महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री साहेब
5️⃣ मुंबई उच्च न्यायालय
⚠️ शेवटचा सवाल...?
आज जर प्रशासन जागं झालं नाही,
तर उद्या होणाऱ्या प्रत्येक अपघाताला
जबाबदार अधिकारीच जबाबदार असतील.
📢 हा प्रश्न केवळ मनमाडचा नाही—तो प्रत्येक प्रवाशाच्या जीवाचा प्रश्न आहे.
✍️ जबाबदार अधिकारी यांनी याची तात्काळ दखल घ्यावी हीच अपेक्षा.
⚖️अंतराष्ट्रीय मानव अधिकार रक्षक मंच
राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे