25/08/2021
बँकेच्या वसुलीच्या कारवाया थांबवायला पाहिजे.
नमस्कार
आज कोविड ची थोडी झळ कमी झाली आहे असे वाटते. गेल्या 25/03/20 पासून जवळजवळ सगळे जग ठप्प झाले होते किंवा अजून ही सावरलं नाही. अजून धंदा व्यवस्थित चालू झालेले नाही. आज माणसं अजून धक्क्यातून सावरले नाहीत. तिसरी लाट पण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजुन ही साशंकता आहे. त्यामुळे धंद्याला किती बळकटी मिळेल हे सांगणं अवघड आहे.
धंदा चालू कसा करायचा ह्याचा मोठा प्रश्न आहे. आज जवळजवळ 17 महिने झाले धंदा बंद तरी पण मुलांच्या शाळा, कामगारांचे पगार, टेक्सेस, घर पट्टी, वीज बिल, इतर परवानगी शुल्क, औषध उपचार इत्यादी सुरू आहेत. उद्या समजा तिसरी लाट आली तर जिवंत राहाण्याची व्यवस्था पण करावी लागणार आहे.
खरे तर लाॅकडाउन हा शासनाने लावला होता आणि त्या काळात सगळ्या व्यवसायिक लोकांनी त्यांना पाठिंबा दिला (कारण तो सगळ्यांच्या हिताचा होता). हे सगळे शासनाच्या सांगण्यावरून व्यावसायिकांनी त्यांचे ऐकले. ह्या काळात सरकारने देखील काही प्रमाणात सवलती दिल्या, विषेशतः 6 महिने हप्ते न भरण्याची सवलत दिली होती, परंतु व्याज चालूच होतं. त्या नंतर परत काही महिन्यांनी केंद्र सरकारने आरबिआय च्या माध्यमातून सगळ्या वित्तीय संस्थांनी दोन वर्षांची सवलत द्यावी पण ते प्रत्येक वित्तीय संस्थेने स्वतःचा निर्णय घेण्याची मुभा दिली.
माझ्या माहिती प्रमाणे सार्वजनिक श्रेत्रातील सगळ्या वित्तीय संस्थांनी ही सवलत दिली आहे. परंतु एखादी संस्था सोडली तर खाजगी वित्तीय संस्थांनी आणि सहकारी संस्थांनी ही सवलत दिली दिसत नाही. ह्या संस्थांनी आता वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे. आधिच लोकांना विज बिल, कामगारांचे पगार, शाळा कॉलेजचे शुल्क, घर भाडे, घर पट्टी इत्यादी आणि काही ठिकाणी तर दोन वेळचे खायचे वांदे झाले आहेत. काय करायचे हा विचार करत असताना सेक्युरिटायझेशन च्या कायद्याखाली ह्या संस्थांनी वसुली सुरू केली आहे. ह्या कायद्या मध्ये कारवाई झाल्या शिवाय कर्जदाराला कोर्टात न्याय मागता येत नाही. न्यायालयात जायचं तर कमीत कमी रू. एक लाख खर्च आहे, जि करायची पण आयपत नसते. ही झाली व्यवसायिक लोकांची व्यथा.
नोकरदारांची व्यथा तर फार भयानक आहे. बर्याच लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत, नोकर्या आहेत तर पगार नाहीत किंवा कमी केले आहेत, वेळेवर मिळत नाही. त्यांना मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, खाण्याचा खर्च, औषध उपचाराचा खर्च असे अनेक खर्च आहेत, वृद्ध आई वडिलांच्या औषध उपचारांचा खर्च आहेत आणि आता थकलेल्या घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, इंसुरंस चे हप्ते, पैसे आण्णार कुठुन. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता नाही आणि आता ह्या वित्तीय संस्थांच्या कारवायां मुळे डोक्यावर चे छप्पर जाण्याची वेळ आली आहे. काय करावे हेच समजत नाही.
ज्या लोकांचं हाता वरचं पोट आहे त्यांची व्यथा तर भयानक आहे. उदाहरणार्थ टॅक्सी वाले, रिक्षा वाले, छोटे वाहतूक व्यवसायिक, गाडीवर घरोघरी फिरून कपडे विकणारे, ह्याच्या गाड्या ओढून नेल्यावर ह्यांनी काय आणि कसा व्यवसाय करावा. कुठुन पैसे कमवायचे आणि कशी पोट भरायची. मुलांना शिक्षण देता येत नाही, औषध उपचार करता येत नाही का किराणा मालाचे पैसे भरता येत नाही तर वृद्ध आई - वडिलांना, स्वतःच्या पोटच्या मुलांना उपाशी रहाताना बघवत नाही. घर भाडे भरता येत नाही तर काय करायचे.
भीक मागता येत नाही, बेकायदेशीर अस्ल्या मुळे दरोडा घालता येत नाही का चोरी करता येत नाही, ताकद नसल्यामुळे खंडणी गोळा करता येत नाही. एकजूट नसल्यामुळे सरकारवर दबाव टाकता येत नाही. परिस्थिती ची जाणीव आणि जबाबदारी ची जाणीव असल्यामुळे आत्महत्या करता येत नाही. असेच खंगत राहिलो तर झटकन ह्रदय विकाराच्या झटक्याने मरण्याचे देखील भय वाटते.
वित्तीय संस्थांचे अधिकारी तर सरळ सांगतात की आम्हाला तुमच्या कडून पैसे नाहीतर वास्तू किंवा वस्तू ताब्यात घेण्याचा पगार मिळतो. आणि आधिच पैशाने ग्रासलेला माणूस खचून जातो. एकदा कारवाई झाली की परत नवीन कर्ज मिळत नाही त्यामुळे खाजगी सावकारा कडे जावं तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्या सारखं होते.
सरकार दरबारी हिच इच्छा आहे की ज्या कर्जदारांवर 25/03/20 च्या आधी कुठलीही कारवाई केली नव्हती त्यांच्या वर अजून पुढील दोन वर्षे तरी कारवाई नको. खरे तर व्याज पण माफ करायला पाहिजे. आत्महत्या करायची नाही पण वित्तीय संस्थांच्या अशा कारवायां मुळे देशोधडीला नक्की लागू , काही लोक वाम मार्गाला लागतील, काही सुडबुद्धीने पेटून खूनी दरोडेखोर होतील, हुशार मुलं शिक्षणा पासून वंचित राहून बरबाद होतील.
तर मित्रांनो आपल्या ला आधी सरकार दरबारी आपली व्यथा मांडायला पाहिजे आणि नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात दाद मागायला पाहिजे. हे एक्टयाचे काम नाही. शासनाला आणि न्यायालयाला संख्या दिसावी लागते. त्यामुळे तुमच्या वर, तुमच्या नातेवाईकांवर, तुमच्या मित्रांवर, तुमच्या माहितीत कोणावरही अगदी तुमच्या शत्रूवर देखील आसा प्रसंग आला असेल तर त्यांनी आपला खालील प्रमाणे संपूर्ण तपशील [email protected] ह्या मेल आयडी वर पाठवून द्यावा. आपल्या सगळ्या गोष्टी गुपित ठेवल्या जातिल. खालील प्रमाणे माहिती द्यावी
1) कर्जदाराचे नाव
2) कर्ज घेतलेल्या संस्थेचे नाव
3) शेवटचा हप्ता अथवा व्याज कधी भरलं
4) आपला संपर्क क्रमांक
5) आपल्या ला पाठवलेल्या वसुलीसाठी च्या नोटीस ची तारीख
6) आत्ता ची कारवाई ची स्थिती
7) गावाचे नाव
ह्या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या मेल आयडी वर पाठवून द्याव्यात.
इथे फोन नं देता येणार नाही. त्यामुळे फोन नं मागू नये तसेच पोस्ट खरी आहे का खोटी आहे असले चहाटळ प्रश्न करू नयेत.
कळावे आपलाच हितचिंतक
भगवंत कुलकर्णी
पुणे
हा मेसेज जास्तीतजास्त शेअर करा. हीच काळाची गरज आहे.