29/08/2025
*महाराष्ट्र देशा वेळ आली आहे.*
*वेळ आली आहे. आता बहुजन समाज बांधव, नेते, विरोधक सर्वांनी एकदा समोर येऊन गेल्या ४० वर्षांपासून व शेकडो बांधवांच्या बलिदानाने रक्तरंजित झालेल्या आंदोलनाला पूर्णविराम देण्याची. आता न्याय द्यायचं काम करावे. आजी-माजी सर्व विधानसभेचे सदस्य, खासदार, राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री सर्व मंडळींनी समोर येऊन न डगमगता यासाठी प्रयत्न करावा तळागाळातील बहुजन समाजाची ही विनंती आहे, गेल्या अनेक वर्षां पासून मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पाठीराख्याचे काम करत असताना, आज त्यांच्या लेकरा बाळांवर दैनंदिन जीवनात उपासमारीची व गरिबीची वेळ आली आहे, यामध्ये काही लोक खूप मोठे असतील सुद्धा, मात्र जास्त प्रमाणात गरिबीने त्रासलेले आहेत, या लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून अठरा पगड १२ बलतीदारांमध्ये आपल्या झोळीत काहीतरी*
*आमदारकी खासदारकी किंवा जलदआर्थिक सक्षम होण्यासाठी द्वेष पसरवून काही समाजकंटक भांडण लावून देण्याचे काम करत आहेत, हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला आहे, हे अतूट नातं जे शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर उभे आहे, हे नियमित चालण्यासाठी आपण सर्व बहुजन बांधवांनी सुद्धा समोर यावे. जेणेकरून गाव गाड्या पासून ते महाराष्ट्रभर हे अतूट नातं पहिल्यासारखं विश्वासाने भरलेल राहावं व प्रत्येक माणसाला आपला माणूस म्हणून मदतीचा हात नेहमीप्रमाणे एकमेकांना मिळावा व या भारत वर्षात एकमेव असलेला आपलं समृद्ध राज्य ज्यांनी देशभरात धर्माचे व माणुसकीचे रक्षण केले, देशाचे रक्षण केले, माय माऊलींचे रक्षण केले. त्या सर्व बहुजन, १८ पगड १२ बलुतेदार शिवरायांच्या मावळ्यांचे राज्य समाजातील काही स्वार्थी माणसांमुळे*
*विस्कटून जाऊ नये याची जबाबदारी घ्यावी व प्रत्येकाला लोकशाही मार्गाने न्याय मिळावा, प्रत्येकाच्या मुलाला समानता मिळावी, त्याला आपल्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यात अन्याय झाल्याप्रमाणे वाटू नये. असं हे समतेचे राज्य पुन्हा एकदा दुरुस्त व्हावं यासाठी सर्वांनी पुढे येण्याची वेळ आता आली आहे, साकारात्मकविचाराने व आपल्या महापुरुषांचेविचार मोठ्या मनाने पुढे ठेवून समोर येण्याची आज गरज आहे. आज नाहीतर कधीच नाही. जे गरीब गरजवंत लोक आज जीवाची बाजी लावून हुतात्मा पत्करून गेल्या ४०